शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पाणी धोरणासाठी केंद्र, राज्याकडे पाठपुरावा : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 20:42 IST

तासगाव/कवठेएकंद : धरणातील पाण्याला हजार, बाराशे रुपये आणि स्वत: तयार केलेल्या पाणी संस्थांच्या योजनांसाठी चार ते पाच हजार रुपये पाणीपट्टी अन्यायकारक आहे.

ठळक मुद्देकवठेएकंदला सिद्धराज पाणी संस्थेचा रौप्यमहोत्सव सिंचन योजनेच्या वीज बिल दरात सवलत दिली पाहिजे. कारखानदारी बंद पडल्यामुळे हजारो लोकांचे संसार अडचणीत येतात.

तासगाव/कवठेएकंद : धरणातील पाण्याला हजार, बाराशे रुपये आणि स्वत: तयार केलेल्या पाणी संस्थांच्या योजनांसाठी चार ते पाच हजार रुपये पाणीपट्टी अन्यायकारक आहे. पाणी मिळविण्याचे धोरण निश्चित करायला हवे. सिंचन योजनेच्या वीज बिल दरात सवलत दिली पाहिजे. स्व:कर्तृत्वावर उभारलेल्या पाणी योजनांची पाणीपट्टी शासनाच्या पाणी योजनेप्रमाणे आकारली येईल, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे एकत्रित मागणी करू, अशी ग्वाही माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी दिली.

कवठेएकंद (ता. तासगाव) येथे सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा योजनेच्या रौप्यमहोत्सवी समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आ. पतंगराव कदम अध्यक्षस्थानी होते. यावेळी खा. संजयकाका पाटील, आ. जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील, शेकापचे आमदार जयंत पाटील, आ. मोहनराव कदम, आ. धैर्यशील पाटील, माजी आमदार संपतराव पवार-पाटील,अरुण लाड प्रमुख उपस्थित होते.

पवार म्हणाले की, तासगावची सर्कस, तास गणेश द्राक्षे, स्वातंत्र्य लढ्यातील संघर्ष यात येथील लोकांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे. येथील माणूस लाचारीने हात न पसरता हिमतीने लढणारा आहे. दुष्काळी भाग, पाणीटंचाई अशा परिस्थितीतही कवठेएकंदच्या शेतकºयांनी एक वचनाने शेतीची पाणी योजना उभी केली. आता दुष्काळी परिस्थिती, शेतीसमोरील अडचणी यासाठी सगळेजण बसून काम करू. यासाठी खासदार संजयकाकांचीही साथ मिळेल. डोक्यावर कर्जाचा बोजा घेऊन ही पाणी योजना गेली पंचवीस वर्षे चांगली चालवली आहे. एकीकडे आम्ही शासनाने बांधलेल्या धरणातील पाणी हजार ते बाराशे रुपये पाणीपट्टी भरून वापरतो, तर दुसरीकडे स्वत: कर्ज काढून उभ्या केलेल्या पाणी संस्थेतून चार-पाच हजाराची पाणीपट्टी भरून पाणी मिळते. हे बदलायला हवे. वीज दरवाढ व पाणीपट्टी यासाठी सवलत दिली पाहिजे. बागायती शेतीतून शेतकरी संपन्न होण्यासाठी पाणी योजनांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यायला हवे. त्यासाठी जयंत पाटील, पतंगराव कदम आम्ही मिळून केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, खासदार संजयकाकाही त्यासाठी साथ देतील.आ. पतंगराव कदम म्हणाले की, पाणी योजना उभारणीच्या काळात आर. आर. पाटील यांनी सहकार्य केले. अडचणीच्या काळात भू-विकास बँकेच्या कर्जासाठी एकरकमी परतफेड योजना राबवून कर्जात व व्याजात मोठ्या सवलती दिल्या. धाडसी शेतकºयांनी योजना चांगल्याप्रकारे चालवली आहे. योजना उभारणीत एन. डी. पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. आपल्या खात्यात आपणच मुख्यमंत्री, अशा पध्दतीने त्यांनी जनतेची कामे केली. आज ‘पैसे मिळवा, इलेक्शन जिंका’ असे काम चालू आहे, पण हे तात्पुरते सुख आहे. सगळ्यांची कामे करा. सत्ता लोकांसाठी वापरा. महाराष्टÑातील शेती धोरणामध्ये पवार यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी आता आघाडीचे नेतृत्व करावे.ज्येष्ठ शेतकरी सुरेंद्र सकळे व जयसिंगराव पाटील यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. रामचंद्र थोरात यांनी स्वागत केले. प्रा. बाबूराव लगारे यांनी प्रास्ताविकात, योजना उभारणीसाठी ज्या पिढीने योगदान दिले, अडचणीच्या काळात योजना चालविली, अशी मंडळी वृध्दापकाळाकडे जात आहेत. नव्या पिढीला योगदानाची जाणीव व्हावी, यासाठी रौप्यमहोत्सवाचे आयोजन केले असल्याचे सांगितले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य डी. के. पाटील, पंचायत समिती सभापती माया एडके, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, बाजार समितीचे माजी सभापती अविनाश पाटील, डॉ. बाबूराव गुरव, सरपंच राजश्री पावसे, उपसरपंच विजयमाला लंगडे, पंचायत समितीच्या सदस्या बेबीताई माळी उपस्थित होते. सूर्यकांत पाटील यांनी आभार मानले.कृतज्ञता सत्काराने गौरवपाणी योजनेचे संस्थापक डॉ. नरेंद्र खाडे व शंकरराव माळी यांचा सपत्नीक सत्कार करून रौप्यमहोत्सवानिमित्त चांदीचा जलकुंभ देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्यासह संचालक मंडळ व सेवकांचाही सत्कार करण्यात आला. योजना उभारणीच्या काळात योगदान देणाºया सभासद, शेतकºयांचा कृतज्ञता सत्कार स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.साखर कारखानदारी आॅक्सिजनवर : शरद पवारराज्यातील सहकार चळवळीला यशवंतराव चव्हाणांनी दिशा दिली. मात्र आज या गोष्टीची फार काळजी वाटते. आज काही ठराविक साखर कारखाने सोडले, तर बाकीचे कारखाने आॅक्सिजनवर आहेत. हे चित्र चांगले नसल्याची खंत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली. तासगाव कारखाना बंद पडला. सांगलीसारखा मोठा कारखाना आर्थिक अडचणीत आला. कारखानदारी बंद पडल्यामुळे हजारो लोकांचे संसार अडचणीत येतात. शेतकºयांंचे नुकसान होते. त्याची काळजी घेतली पाहिजे, असे भावूक मत यावेळी पवारांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :Politicsराजकारणwater transportजलवाहतूक